मराठी चित्रपटात काम करण्याची तयारी फक्त…; आयुष्यमान खुरानाने सांगितली अट

Ayushmann Khurrana : मराठी चित्रपटात काम करण्याची तयारी फक्त...; आयुष्यमान खुरानाने सांगितली अट

[ad_1]

Ayushmann Khurrana :   हिंदी सिनेमा नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. तेव्हा ‘सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल, असे स्पष्ट मत अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) याने व्यक्त केले.  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता असलेला आयुष्मान खुराना हा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होता. 

मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने अभिनेता आयुष्यमान खुराना याचा पत्रकार संघात वार्तालाप पार पडला. यावेळी त्याने पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. चित्रपटातील करिअरची सुरुवात ते राष्ट्रीय पुरस्कार पर्यंतचा 12 वर्षांचा प्रवास आयुष्यमानने  उलगडला. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते अभिनेता आयुष्यमान खुराना याचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वाबळे यांनी ‘स्टार ऑफ द डिकेड’ (दशकातील सर्वोत्तम अभिनेता) अशा शब्दात आयुष्यमान खुराणाचा गौरव केला. 

Ayushmann Khurrana : मराठी चित्रपटात काम करण्याची तयारी फक्त...; आयुष्यमान खुरानाने सांगितली अट

आयुष्मान खुरानाने वार्तालाप कार्यक्रमात म्हटले की, कोणत्याही सिनेमात काम करताना तो सिनेमा हिट होईल, या उद्देशाने मी कधीच काम करीत नाही. जी कथा कधीच पडद्यावर आलेली नाही. प्रेक्षकांसाठी वेगळी आणि नवीनच असेल आणि नवीन काहीतरी करायचे या विचारानेच काम करतो. चंदीगड ही माझी जन्मभूमी असली तरी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. सगळेजण स्वप्न घेऊन मुंबईत येतात तसाच मी मुंबईत आलो आणि आता मी मुंबईकर आहे असेही त्याने म्हटले. 

पुरस्कार मिळावा यासाठी कधीच काम करत नाही

राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार मिळावा या उद्देशाने मी सिनेमात कधीच काम करीत नाही. काम केलेलेही नाही. प्रेक्षकांना आवडेल, भावेल अशाच नवनवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी करत असतो, असेही आयुष्यमानने म्हटले. नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करूनच आपण अनेक हिट सिनेमा दिले, नवीन दिग्दर्शकाकडे रिस्क घेण्याची क्षमता असते, असेही त्याने सांगितले. यावेळी आयुष्यमानकडून ‘आलमारी की खुशबू’ ही आपली कविता सादर केली तेव्हा उपस्थितांकडून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली.

दरम्यान, प्रास्ताविक कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले. याप्रसंगी मंचावर विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि राही भिडे उपस्थित होत्या.

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *