[ad_1]
मुंबई : मुंबईच्या जागा वाटपावरून संजय निरुपम यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसचा श्रद्धांजलीचा काळ सुरू झालेला आहे अशी जहरी टीका केली होती. यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी आता संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यावर टीका केली आहे. निरूपम यांच्या शब्दाला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, स्वतःचा स्वार्थ साधला गेला नाही म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे निषेधार्थ आहे अशी टीका त्यांनी केली. लोकशाहीची श्रद्धांजली करण्याचं भाजपने जे काम सुरू केले आहे त्याच्यावर तुटून पडण्याची ही वेळ आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्याला विरोध केला होता. खिचडी चोर अमोल किर्तीकर यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच आपल्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link