Relationship Tips : जोडीदाराशी वाद ठीक, पण त्यानंतर केलेल्या ‘या’ चुकांमुळे नातं तुटू शकते, जाणून घ्या

[ad_1]

Relationship Tips : नात्यात तुमचं तुमच्या जोडीदाराशी भांडण किंवा वाद होणे तशी सामान्य गोष्ट आहे. पण भांडण झाल्यावर लगेचच जोडीदाराशी तडजोड करण्याची अनेकांना सवय असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जोडीदाराशी वाद झाल्यानंतर तुम्ही ते सोडवण्याचा विचार करता. पण हे करताना तुम्ही केलेल्या तीन चुका महागात पडू शकतात. अनेक वेळा जोडीदाराशी समेट घडवण्याच्या प्रक्रियेत काही गोष्टी चुकीच्या ठरतात आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही राहत नाही. आजच्या लेखात आपण या गोष्टींबद्दल बोलणार आहोत.

कळत-नकळत बोलल्याने वाद वाढू लागतो

नातेसंबंधांमध्ये वाद सामान्य आहेत आणि ते नियमितपणे संवाद असणे महत्वाचे आहे. कारण काही प्रमाणात ते नातेसंबंध टिकवून ठेवते. कारण जोपर्यंत संभाषण थांबत नाही आणि आपल्याला एकमेकांचे तोंड पाहणे आवडत नाही तोपर्यंत ही परिस्थिती हाताळता येते. भांडण झाल्यावर काही गोष्टी कळत-नकळत बोलल्या गेल्याने वाद वाढू लागतो.

वादाच्या कारणाकडे कधीही लक्ष देऊ नका

अनेकदा जोडप्यांमधील वाद कालांतराने कमी होतात. पण जर एखाद्या जोडप्याने वाद का केला ते स्वतःला आठवण करून देत राहिल्यास वाद संपणार नाही. म्हणून जर तुम्हाला वाद संपवायचा असेल तर वाद कोठून सुरू झाला याबद्दल बोलू नका, कारण असे केल्याने ठिणगी पुन्हा पेटू शकते. भांडणाची सुरुवात कुठून झाली यावर चर्चा करून सामंजस्याचा विचार करत असाल तर आपली चूक होत आहे. अनेक वेळा यामुळे पार्टनर आणखी चिडतो.

समेट करण्याचे ढोंग करू नका

वाद मिटवण्याचा आणि शांतता प्रस्थापित करण्याचा तुमचा हेतू असेल तर ते दाखवण्यासाठी नव्हे तर मनापासून करा. कारण अनेक वेळा खोट्या भावना समोर येतात आणि मग नवा वाद सुरू होतो. चूक तुमची असेल तर ती सहज मान्य करा, माफ करा आणि समोरच्या व्यक्तीचीही चूक असेल तर गोष्टी आणि परिस्थिती समजून घेऊन प्रकरण संपवण्याचा प्रयत्न करा. परंतु बहुतेक जोडपी केवळ समेट करण्याचे नाटक करतात. रिलेशनशिप एक्सपर्टच्या मते, हे तुमच्या रिलेशनशिपसाठी चांगले नाही, जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत काही समस्या असेल तर त्यावर चर्चा करा आणि त्यावर उपाय शोधा.

अजिबात घाई करू नका

वाद सोडवण्यासाठी घाई करण्यात अर्थ नाही. जर एखाद्या गंभीर विषयावर वादविवाद होत असेल तर आपल्या जोडीदाराला शांत होण्याची संधी द्या. संवादातून तोडगा काढणे हा योग्य मार्ग आहे, पण योग्य संधीची वाट पहा. रागाच्या भरात योग्य गोष्टही चुकीची वाटते आणि योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसते. भांडणानंतर, छेडछाड आणि शिवीगाळ करण्याची सवय सोडून द्या आणि काही काळ एकमेकांना एकटे सोडा. पण त्यानंतर विषय कसा शांत करता येईल याची काळजी घ्या.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Relationship Tips : ‘कधीतरी पतीच्याही भावना समजून घ्या की…’ नवऱ्याला पत्नीकडून नेमकं काय हवं असतं? 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *